मुंबईतून फरार झालेला आतंकवादी डॉ. अन्सारीला कानपूरमध्ये अटक, देश सोडण्याच्या होता तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतून गुरूवारी फरार झालेला दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उत्तरप्रदेशचे पोलिस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली आहे.

डॉ. जलीस अन्सारी हा देश सोडण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली जात असल्याचे पोलिस महासंचालक सिंह यांनी सांगितले आहे. देशातील अनेक साखळी बॉम्बस्फोटामध्ये तो दोषी असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. जलीस अन्सारी हा गुरूवारी अचानकपणे मुंबईतून गायब झाला होता. तो गेल्या महिन्यातच अजमेर जेलमधून पॅरोलवर बाहेर आला होता. 50 हून अधिक साखळी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/