नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामान विभागानुसार येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्र आणि गुजरात काही भागात धो-धो पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुजरातच्या काही भागात नारंगी अलर्ट जारी केला आहे. शनिवारी गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्र, कोकण, गुजरात, गोवा, तमिळनाडू, अंदमान निकोबार, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पाँडीचेरी या भागात जोरदार पावसाच्या सरी बरसू शकतात.
12 राज्यात होऊ शकतो पाऊस
हवामान विभागाने झारखंड आणि ओडिशामध्ये वेगाने वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबतची चेतावणी देखील देण्यात आली आहे. तसेच समुद्र किनारी असलेल्या भागात 65 किमी वेगाने वारे वाहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याबाबत इशारा दिला आहे.
दिल्लीत शनिवारी पावसाचे वातावरण असेल. वेगाने वारे वाहून पाऊन पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून 23 सप्टेंबरला देखील अलर्ट घोषित करण्यात आला आहे. उद्या हवामान विभागाने उत्तरप्रदेशच्या 16 जिल्ह्यात जोरदार पाऊसाचा इशारा दिला आहे.
Visit – policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा