… तर मी तिची माफी मागेल – आलिया भट 

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी बेधडक वक्तव्य करून कंगनाने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला होता. कंगनाच्या ‘मणिकर्णिका – द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट रिलीज  झाला तेव्हा तिच्या या चित्रपटाविषयी कोणी काही बोलले नाही. आणि तिला कोणी सपोर्ट सुद्धा केला नाही याच गोष्टीचा कंगनाला खूप राग आला आणि यावरून तिने आमिर खान, आलिया भट आणि ट्विंकल खन्ना यांच्यावर टीका केली होती.

कंगनाने केलेल्या आरोपावर आलियाने प्रतिक्रिया दिली आहे. तिने केलेल्या या आरोपावरआलिया आता कंगनाची माफी मागणार आहे. मीडियाशी बोलताना आलिया म्हणाली, कंगना माझ्यावर नाराज असेल तर मी व्यक्तिश:तिची माफी मागेल. कंगनाला मी आवडत नाही, असे मला अजिबात वाटत नाही. मी शूटींगमध्ये बिझी होते आणि म्हणून तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जावू शकले नाही. तिला नाराज करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, मी तिला नाराज केले, असेही मला वाटत नाही. पण असे असेलच तर मी तिची माफी मागेल, असे आलिया म्हणाली.

एवढेच नाही तर यावेळी आलियाने तिचे कौतुकही केले आहे. मी कंगनाची फॅन आहे. ती परखड आहे. तिने स्वबळावर स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. हे करायला हिंमत लागते. असा शब्दात तिने कंगनाची कौतुक केले आहे.

काय म्हणाली होती कंगना
कंगनाने असा आरोप केला होता की,आलिया व आमिर त्यांच्या चित्रपटाच्या ट्रायलसाठी मला आवर्जुन फोन करुन बोलवतात. पण माझ्या चित्रपटाच्या ट्रायलकडे पाठ फिरवतात. आमिर खान व ट्विंकल खन्ना महिला सक्षमीकरणावर तासन् तास बोलतात. पण मणिकर्णिकासारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची  एका ओळीचीही प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान करत आहे, असा आरोप कंगनाने यावेळी केला होत.