पोलीसनामा ऑनलाइन टीम – केरळच्या मलप्पुरममध्ये एका गर्भवती हत्तीनीला अननसातून फटाके खायला घालून मारल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला आहे. पोटात झालेल्या बारामुळं (ब्लास्ट) हत्तीनीचं तोंड आणि सोंड यांचं खूप नुकसान झालं आणि मोठी जखम झाली. यानंतर त्या हत्तीनीचा मृत्यू झाला. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. अशात आता बॉलिवूडमधूनही या घटनेवर प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी आपला राग व्यक्त केला असून सोशलवर #RIPHumanity आणि #Elephant हे हॅशटॅगही ट्रेंड करताना दिसत आहेत. अभिनेता वरूण धवनसह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मानं इंस्टा स्टोरीला पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, या सगळ्या घटनांमुळंच पशु हत्ये विरोधात कडक कायदे करण्याची गरज आहे. तिनं लिहिलं आहे की, आम्ही केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी आरोपींना पकडून कठोरातील कठोर शिक्षा करावी.
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनंही राग व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यानं म्हटलं की, जनावरं कमी जंगली आणि मानवातील मानवता कमी झाली आहे. जे काही झालं ते हृदयद्रावक होतं. दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यानं केली आहे.
Maybe animals are less wild and humans less human. What happened with that #elephant is heartbreaking, inhumane and unacceptable! Strict action should be taken against the culprits. #AllLivesMatter pic.twitter.com/sOmUsL3Ayc
— Akshay Kumar (@akshaykumar) June 3, 2020
जॉन अब्राहमनंही म्हटलं आहे की, माणूस असल्याची लाज वाटत आहे. जॉननं मुख्यमंत्र्यांनाही टॅग केलं आहे. श्रद्धा कपूर हिनंही राग व्यक्त करत म्हटलं आहे की, इथं कुणाकडे हृदय राहिलेलंच नाही.