मुंबई : वृत्तसंस्था – अलीकडच्या काळात अभिनेत्री आलिया भट्टने अनेक वेगवेगळ्या चित्रपटात अनेक विशेष भूमिका साकारल्या आहेत. आलिया भट्टने अल्पावधीतच अनेक चांगले चित्रपट देऊन एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. सध्या तिचे करिअर जोरात सुरू असून त्यात तिची चांगली वाटचालही आहे. सध्या तिचे आणि अभिनेता रणबीर कपूर यांचे नातेही चांगलेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आलिया सध्या रणबीरबरोबरचे आपले नाते अतिशय गांभीर्याने घेऊन त्यालाच प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.
कॅटरिना आणि रणबीरचे अफेअर सर्वांना माहीतच आहे. पुढे जाऊन त्यांचे ब्रेकअपही झाले. सांगायचा मुद्दा असा की, कॅटरीनाने रिलेशनशिपमध्ये असताना जी चूक केली ती करणे आलिया मात्र टाळताना दिसत आहे. कॅटरिना आणि रणबीर दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत असूनही दोघांनी आपापल्या करिअरना अधिक प्राधान्य दिले होते व दोघांकडे एकमेकांसाठी पुरेसा वेळ नव्हता. हेही त्यांच्या ब्रेकअपचे एक कारण बनले होते.
‘मला रणबीरशी लग्न करणे आवडेल’, असे आलियाने खूप पूर्वी एका मुलाखतीत सागंतिले होते. यावरून दिसत आहे की, आलियाला रणबीरबाबत आधीपासूनच ‘क्रश’ होता. जेव्हा तिने हे बोलून दाखवले होते तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही नाते नव्हते. परंतु आता ती रणबीरच्या प्रेमात पडल्यावर तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.