मोदी सरकारनं ‘सेव्हिंग’ अकाऊंट संदर्भात केली मोठी घोषणा ! आता राहणार नाही ‘मिनिमम’ बॅलन्स ठेवण्याचं ‘टेन्शन’
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बचत खात्यासाठी किमान शिल्लक शुल्कापासून संपूर्ण सूट जाहीर केली. म्हणजेच, आता बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना त्यांनी संबोधित केले. या वेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सीतारमण यांनी माध्यमांना इंग्रजीत संबोधित करताना अनुराग ठाकूर यांनी त्यांचे हिंदीमध्ये भाषांतर करून पुन्हा सांगितले.
याशिवाय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, इनसॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड डिफॉल्ट मर्यादा १ लाख रुपयांवरून वाढवून एक कोटी केली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजबाबत म्हंटले की, त्यावर काम सुरु असून लवकरच याची घोषणा केली जाईल.
SBI ने बचत बँक खात्यांसाठी केली मोठी घोषणा –
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. एसबीआयने सर्व प्रकारच्या बचत खात्यांवर अनिवार्य असलेले सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) संपवले आहे. म्हणजेच खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा ग्राहकांचा त्रास संपला आहे. एसबीआयच्या या निर्णयाचा फायदा ४४.५१ कोटी ग्राहकांना होईल. या व्यतिरिक्त, आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये एसबीआयने बचत बँक खात्यांवरील आपल्या व्याज दरांना तर्कसंगत बनवत वार्षिक तीन टक्के केले आहे.