लोकसभेच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढणार

मुंबई : वृत्तसंस्था

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठक घेतल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना भवनात बैठक घेतली. या बैठकीमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व ४८ जागा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच गणेशोत्सवापूर्वीच उमेदवार निश्चित केले जाणार असून त्यासाठी शिवसेनेने आत्तापासूनच चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e84f19dd-aac4-11e8-b446-cb2eda0e82ca’]

मुंबईत लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यातील काही मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडून ते मतदारसंघ कशा प्रकारे हिसकावता येतील यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. तसेच शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना रणनीती आखणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील खासदार, आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपली, त्यानंतर शिवसेना लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र : शरद पवार 

दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकही या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना दिग्गज नेत्यांना भाजपाच्या विरोधात रिंगणात उतरवणार आहे.

लोकसभेसाठी पुण्यात भाजपही सक्रीय संयोजकपदी दीपक मिसाळ