मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की महायुतीसाठी आमची दारे अजूनही खुली आहेत. महायुतीत निवडून आलो, महायुतीसाठी दार बंद नाहीत. यावेळी युती तुटली नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की आमची खंत दूर होणार असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. जेव्हा आम्ही त्यांना सांगितले की अशी विधाने करणं बंद करा तेव्हा ते म्हणाले की आम्ही धोरणांवर टीका करत आहोत, व्यक्तिगत टीका करणार नाही. परंतू असे झाले नाही. युती तुटली आहे असे मी म्हणणार नाही. अशी घोषणा आम्ही केलेली नाही. केंद्रात देखील आम्ही एकत्र आहोत. त्यांनी देखील अशी घोषणा केली नाही, युती कायम आहे.
मतभेद दूर झाल्यास मिळून सत्ता स्थापन करु असे सांगण्यास देखील फडणवीस विसरले नाहीत. भाजप शिवसेनेला जोडणारा धागा हिंदुत्व आहे, आमच्यातील मतभेद दूर झाले,आमची खंत दूर होणार असेल तर आम्ही एकत्र सरकार स्थापन करु. यानंतर आमचेच सरकार येईल असे देखील ते म्हणाले. यावरुन स्पष्ट झाले की देवेंद्र फडणवीस अजूनही शिवसेनेला घेऊन सत्तात स्थापन करु शकतात. कारण फडणवीस यांनीच चर्चाची दारं खुली असल्याचे स्पष्ट केले आहे.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या