‘युती केली हेच चुकलं ! नाहीतर विधानसभा निवडणुकीत 150 जागांच्या पुढे गेलो असतो’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे प्रमुख वक्ते होते. भाऊ तोरसेकरांनी जी राजकीय भाकितं केली होती त्याचा आधार घेऊन फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
LIVE | श्री भाऊ तोरसेकर यांचे आपल्या यशस्वी पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या कारकिर्दीवर संबोधन…
भाजपा महाराष्ट्र सेवा सप्ताह व्हर्च्युअल रॅली. विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis, प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत. https://t.co/kAo41iccN8— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 18, 2020
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्ये सांगितलं होतं की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत 272+ जागा भाजपला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असे अनेकांना वाटले होते. मात्र, त्यांचे ते भाकित खरे ठरले आहे. 2019 मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की 300+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं.
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपला पर्याय दिले होते. भाजपा 150+ किंवा युती 200+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचे तिसरे भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 150+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केवळ गैरसमज निर्माण केले जात आहेत
कोरोनाच्या काळात देखील विक्रमी एफडीआय भारतात आला. हा आज जगाचा भारतावर असलेला विश्वास आहे. शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवल्या. आता देखील अनेक योजना राबवल्या जात असताना केवळ गैरसमज निर्माण केले जात आहेत. दिल्लीतील प्रस्थापितांना मोठे आव्हान देण्याचे काम त्यांनी केले. ती व्यवस्था इतर आणच्यातील व्हा किंवा बाहेर जा, ही सांगणारी होती. पण मोदींनी हे त्या व्यवस्थेचे भाग न बनता एक नवी व्यवस्था निर्माण केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.