राहुलजी अमेठीला सिंगापूर बनवले का ? : स्मृती इराणी

अमेठी : वृत्तसंस्था – अमेठीला सिंगापूर बनवतो म्हणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीला सिंगापूर बनवले का? असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, अमेठी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यावेळी ”राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अमेठीमध्ये विकास कामे झाली आहेत. इथे जो काही विकास झाला आहे तो भाजपामुळे झाला आहे. आपण अमेठी सोडून जाणार नाही. येथील जनतेची लढाई त्यांच्यासोबत राहूनच लढू असे स्मृती इराणी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, गेली कित्तेक वर्षांपासून, अमेठीला सिंगापूर बनवू असा दावा राहुल गांधी करत आहेत. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर राहुलजी अमेठीला सिंगापूर बनवले का? असा सवालही त्यांनी केला.