‘TV नं मला बॅन केल्यानं मी बॉलिवूडकडे वळालो’, ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येनंतर बॉलिवूमधील गटबाजी आणि घराणेशाहीचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. आतापर्यंत अनके कलाकारांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. सुशांतसोबत काय पो छे या सिनेमात काम केलेल्या अभिनेता अमित साध यानं धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्हीनं माझ्यावर बंदी आणली होती असं त्यानं सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अमित म्हणाला, “मी सिनेमात काम करण्यासाठी टेलिव्हिजन सोडलं नव्हतं. उलट टीव्हीनं मला बॅन केलं होतं. त्यांच्यात एकमेकांमध्ये चर्चा होत असे की, याला काम देऊ नका. म्हणून मग मीही कोणला विनवणी करत बसलो नाही. मी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला.”

अमितनं 20 व्या वर्षीच पडद्यावरील गटबाजीविरोधात लढा दिला. त्याच्या कामाची दखल घेणारे काही लोक त्याला भेटल्यानं त्याला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

अमितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर क्यु होता है प्यार या मालिकेतून त्यानं करिअरला सुरुवात केली होती. 2010 साली आलेल्या राम गोपाल वर्मा यांच्या फूंक 2 या सिनेमातून त्यानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्यानं काय पो छे, गुड्डू रंगीला, सुलतान, सरकार 3, गोल्ड अशा अनेक सिनेमात काम केलं. अलीकडेच अमित ब्रीद- इंटू द शॅडो या वेब सीरिजमध्ये दिसला. यात अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत होता.