HM अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘कितीही विरोध करा, आम्ही नागरिकता देऊनच श्वास घेऊ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसवाले कान उघडून ऐकून घ्या, पाहिजे तितका निषेध करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देऊनच राहू . भारतावर अधिकार जितका माझा आणि आपला आहे तितकाच हक्क पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे. तो भारताचा मुलगा आणि मुलगी आहे, तो आमचा भाऊ आहे.’
अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका मोर्चाला संबोधित करताना म्हणाले कि, ‘आज सर्वच काँग्रेसवासी देशभर सीएएला विरोध करीत आहेत. महात्मा गांधी काय म्हणाले, राहुल गांधी तुम्ही महात्मा गांधींचे ऐकतही नाही. तुम्ही महात्मा गांधींना कधीच सोडले आहे ?
केजरीवाल, ममता, कम्युनिस्ट दिशाभूल करतात :
अमित शहा म्हणाले की, सीएएवर भाजप जनजागृती अभियान चालवित आहे. हे जन जागरण अभियान भाजपा करीत आहे कारण काँग्रेस पक्ष, केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट हे सर्व एकत्र जमून देशाची दिशाभूल करीत आहेत. ते म्हणाले, “आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की सीएएमध्ये कोठेही नागरिकत्व घेण्याची तरतूद नाही, त्यामध्ये नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.”
अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाने धर्माच्या जोरावर देशाची विभागणी केली. फाळणीच्या वेळी, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन लोक भारतात येणार होते, परंतु त्यावेळी ते तेथेच राहिले कारण परिस्थिती योग्य नव्हती. आपल्या देशातील सर्व नेत्यांनी असे आश्वासन दिले की, आपण आता तिथेच रहा आणि जेव्हा आपण भारतात याल तेव्हा आपले स्वागत केले जाईल, भारत आपल्याला नागरिकत्व देईल. अमित शहा यांनी सांगितले की 2 जुलै, 1947 रोजी महात्मा गांधी म्हणाले होते की, ज्या लोकांना पाकिस्तानमधून हाकलून लावले, पाकिस्तानात राहत आहेत त्यांना हे माहित असावे की, ते भारताचे नागरिक आहेत, जेव्हा जेव्हा त्यांना भारतात यायचे होते तेव्हा त्यांना नागरिकत्व दिले जावे.
अल्पसंख्याकांना भडकावले जात आहे :
देशातील सीएएविरोधात सुरू असलेल्या निषेधांबद्दल अमित शहा म्हणाले की देशातील अल्पसंख्यांकांना तुमचे नागरिकत्व गमवावे लागेल यासाठी उकसवले जात आहे. मी देशातील अल्पसंख्यांक बंधू – भगिनींना सीएए वाचण्यास सांगण्यासाठी आलो आहे, यात कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या