नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत करत आपली या स्पर्धेतील चांगली कामगिरी कायम राखली. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. मात्र यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे ट्विट मजेशीर होते. या विजयानंतर त्यांनी एक ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर ३३६ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त २१२ धावाच करू शकला. भारताकडून रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी करत १४४ धावा केल्या.
आणखी एक स्ट्राईक –
टीम इंडियाच्या विजयावर अमित शहा यांनी ट्विट केलं की, ‘टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि याचे परिणामदेखील तसेच दिसून आले आहेत.’ त्याचबरोबर पुढे लिहिले आहे कि, चांगला खेळ केल्याबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन आणि आणि संपूर्ण भारताला तुमच्यावर गर्व आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याची चर्चा सगळीकडे होत आहे. दरम्यान, भारतीय संघ आपला पुढील सामना २२ जून रोजी अफगाणिस्तान बरोबर खेळणार आहे.
Another strike on Pakistan by #TeamIndia and the result is same.
Congratulations to the entire team for this superb performance.
Every Indian is feeling proud and celebrating this impressive win. #INDvPAK pic.twitter.com/XDGuG3OiyK
— Amit Shah (@AmitShah) June 16, 2019
गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.
लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’
रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले
हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’