महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ हटवण्याच्या चर्चेवर HM अमित शाहांचं ‘मोठं’ वक्तव्य, जनतेला दिलं ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. त्यात गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भुमिका मांडत कलम ३७० आणि कलम ३७१ यामघील फरक स्पष्ट केला.

त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडत त्यांनी कलम ३७१ मधील कोणत्याही तरतुदी हटवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. हे कलम महाराष्ट्राशी संबंधीत असल्याने जनतेत संभ्रम निर्माण होत आहेत. त्यामुळे अमित शहांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सध्या कलम ३७० सह कलम ३७१ही हटवण्याबाबात चर्चा सुरु आहेत. लोकसभेत अमित शहांनी यावर खुलासा करत सांगितले, की कलम ३७० हे हटवण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकार कलम ३७१ सुद्धा हटवणार असा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र कलम ३७१ हटवण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक जनतेला ठाऊक आहे, त्यामुळे अपप्रचार करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसंच कलम ३७० हे अस्थायी स्वरूपाचे आहे. योग्य वेळ येताच ते समाप्त होईल, असं पंडित नेहरू म्हणाले होते. मात्र ती वेळ येण्यास ७० वर्षे उलटून गेली. पण आम्ही काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी ७० वर्षे लावणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पुनर्गठन अधिनियम १९६० मधील संशोधनात कलम ३७१ (२) अन्वये १ मे १९६० साली महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांवर लागू करण्यात आले होते. तेव्हा गुजरात या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तर मुंबई राज्याचे महाराष्ट्र नामकरण करण्यात आले होते.

तेव्हा गुजरातच्या निर्मीतीसाठी कच्छ आणि सौराष्ट्र हे वेगळे करण्यात आले होते. तर कलम ३७१ तरतुदींनुसार महराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आले होते. त्यामुळे कलम ३७१ हटवणार नसल्याचे सांगत अमित शहांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –