…म्हणून आम्ही घाई-गडबडीत लग्न केलं ; लग्नाच्या ४६ व्या वाढदिवशी बीग बींनी सांगितला ‘हा’ किस्सा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील बीग-बी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाली. अभिताभ बच्चन यांचे करिअर जसे चर्चेत राहिले तसं त्यांच्या लव्हलाईफवरही अनेक किस्से कानावर पडतात. मात्र त्यांचे लग्न अभिनेत्री जया भादुरी यांच्याशीच झाले. त्यांच्या सुखीसंसाराला ४६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने बीग-बींनी आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी एक ब्लॉग पोस्ट केला आहे.

आपण कशापद्धतीने घाई-गडबडीत विवाहबंधनात अडकलो, त्याचा किस्सा अमिताभ यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. ३ जून १९७३ रोजी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी लग्न केलं. ‘ही १९७३ ची गोष्ट आहे. मी, जया आणि आमच्या काही मित्रांना लंडनमध्ये सुट्ट्यांसाठी जायचं होतं. त्यावेळी मी आणि जया डेट करत होतो. मात्र माझे वडील, अर्थात कविवर्य हरिवंशराय बच्चन म्हणाले होते, की आम्हा दोघांचं लग्न झालं, तरच आम्ही एकत्र जाऊ शकतो. त्यामुळे मी पेचात पडलो’ असं या पोस्टमध्ये बिग बींनी सांगितलं आहे.

जर जंजीर सिनेमा हिट झाला, तर तुम्हाला लंडनमध्ये फिरायला नेईन, असं आश्वासन मी माझ्या मित्रांना दिलं होतं. त्यानंतर वडिलांनी आम्ही कोण कोण जाणार, हे विचारलं. तेव्हा जयाही आमच्या सोबत आहे, हे त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी आमच्या समोर एक अट ठेवली. तुम्हा दोघांना जायचं असेल, तर लग्न करा आणि मगच जा, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा आम्ही दुसऱ्याच दिवशी लग्न केले आणि रात्री लंडनला निघालो, असं बीग-बींनी सांगितलं.

दरम्यान, अमिताभ आणि जया बच्चन यांनी अनेक गाजलेले चित्रपट एकत्र केले. त्यात शोले, सिलसिला, अभिमान यासारख्या अनेक आहेत. तर सेकंड इनिंगमध्ये ते करण जोहरच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातही एकत्र झळकले होते. शिवाय त्यांची लव्हस्टोरीही काहीशी वेगळीच म्हणावी लागेल.