Maharashtra Bandh | अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल; म्हणाल्या – ‘आज वसुली चालू आहे का बंद?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराचा (Lakhimpur violence) निषेध करण्यासाठी आज (सोमवार) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) तिन्ही पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Bandh) संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे भाजप (BJP) नेते महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत आहे. याच वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत खोचक सवाल केला आहे.

अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. आज महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी पुकारलेल्या बंदवर (Maharashtra Bandh) अमृता फडणवसी यांनी ट्विट केले आहे. यामध्ये ‘आज वसुली चालू आहे का बंद?’ असा खोचक प्रश्न विचारला आहे. अमृता फडणवीस यांनी आज वसुली चालू आहे का बंद? असा सवाल करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच #MaharashtraBandhNahiHai असा हॅशटॅग अमृता फडणवीस यांनी वापरला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी आघाडीच्या या बंदला ‘ढोंगीपणाचा कळस’ असे म्हटले आहे. या बंदद्वारे सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून आजचा बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवाद (Terrorism) आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नसून प्रशासनाच्या मदतीने दमदाटी करुन पोलिसांचा वापर करुन लोकांना बंद करायला भाग पाडले जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | बारामतीमध्ये 34 वर्षीय ऑडिट सुपरवायझरची आत्महत्या

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)

Nusrat Jahan Marriage | …अन् नुसरत जहॉंनं दिली प्रेमाची कबूली ! फोटो शेअर करत म्हणाली, झालं दुसरं लग्न..

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amruta Fadnavis | amruta fadnavis tweet on maharashtra bandh is recovery on or off today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update