काय सांगता ! होय, NPR च्या भितीनं गावातील सर्वांनीच रिकामं केलं आपलं बँक अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दिलेल्या जाहिरातीमुळे तामिळनाडूच्या भागात अस्वस्थता वाढली आहे. ही जाहिरात 11 जानेवारी रोजी एका स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती, ज्यामध्ये खातेदारांना लवकरात लवकर केवायसी करण्यास सांगितले गेले होते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) देखील समाविष्ट आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर परिसरातील मुस्लिमांनी बँकेसमोर रांगेत उभे राहण्यास सुरवात केली. खरं तर ही अफवा पसरली होती की ही जाहिरात सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) संबंधित आहे. या अफवाचा परिणाम असा झाला की 20 ते 22 जानेवारी दरम्यान बँकेच्या या शाखेतून, कायलापट्टिनमच्या लोकांनी सुमारे 4 कोटी रुपये काढून घेतले.
अफवेननंतर लोकांमध्ये भीती –
केलापट्टिनम येथे राहणारे वकील अहमद साहिब यांनी सांगितले की, आमची सेंट्रल बँकेशी कोणतीही दुश्मनी नाही, परंतु लोक घाबरत आहेत की बँकेने केवायसीसाठी एनपीआर अनिवार्य करू नये. अस्वस्थ झाल्याने बर्याच लोकांनी बँकेत जमा केलेली रक्कम काढून घेतली. त्यांनी सांगितले कि, स्वतःच त्यांच्या खात्यात जमा केलेले 3.50 लाख रुपये काढले आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सीएएबद्दल आधीपासूनच बरीच शंका आहे, अशा परिस्थितीत बँकेच्या अधिसूचनांविषयी बर्याच अफवा पसरल्या. दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर सेंट्रल बँकला जाग आली आणि अधिकाऱ्यांनी लोकांना पटवून देण्यासाठी घरोघरी जाण्यास सुरवात केली. बँक अधिकारी म्हणाले- एनपीआर ऑप्शनल आहे तो आवश्यक नाही.
सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनाही सांगितले कि, एनपीआर हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि म्हणूनच कायलापट्टिनमचे लोक नाराज आहेत. दरम्यान, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही अशा ठिकाणी पोस्टर्स लावली आहेत ज्यात एनपीआरबद्दल माहिती दिली गेली आहे आणि लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. आम्ही हे देखील स्पष्ट केले आहे की एनपीआर केवळ पर्यायी आहे, ते अनिवार्य नाही. आम्ही हा संदेश ऑटो आणि लाऊडस्पीकरद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देखील केली आहे.
एनपीआर बंधनकारक नसल्याचेही परिसरातील कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅनरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरा नारायण म्हणाले की एनपीआरसाठी केवायसीची गरज नाही. यासाठी बँकेला केवळ आधार किंवा पॅन कार्डची आवश्यकता आहे. हे पेपर बँकेत खाते असणे किंवा नवीन खाते उघडण्यासाठी पुरेसे आहेत. आरबीआयने याबाबत स्पष्ट नियम बनवले आहेत.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !