लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. पण उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यातच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आपली स्वतंत्र आघाडी करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे. काँग्रेसकडून काल प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यात आले. त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे पू्र्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागा आणि लोकसभेच्या २५ जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे, असे ओमेन चण्डी म्हटले. नुकतेच तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाशी (टीडीपी) काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र, आघाडी केल्यावरही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. याचीच जाणीव ठेऊन काँग्रेसने हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.