मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अंगणवाडी सेविका वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधत आपले गाऱ्हाणे मांडणार होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी या सेविकांना वेळ न दिल्याने, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मानधनवाढीची अंमलबजावणी करावी, यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदांवर जेलभरो आंदोलन सुरू केले आहे.
या आहेत अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या –
आदिवासी केंद्रांना एक हजार रुपये द्यावेत.
नागरी अंगणवाडी केंद्रांना ४ हजार द्यावेत.
महानगरमधील अंगणवाडी केंद्रांना सहा हजार भाडे देण्यात यावे.
पूर्वशालेय शिक्षण संचाचे ५ हजार देण्यात यावेत.
फर्निचरसाठी १० हजार मिळावेत.
पिण्याच्या पाण्यासाठी दहा हजार द्यावेत.
मोबाइल वापरण्याबाबतच्या अडचणी दूर कराव्यात / किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करावी.
अशा मागण्या घेऊन अंगणवाडीसेविका रक्षाबंधनदिवशी मुख्यमंत्र्यांना भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे स्वतंत्र दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करणार आहेत.
- ‘या’ भाजीमध्ये आहेत सर्वात कमी फॅट, ‘कोलेस्टेरॉल’ राहते नियंत्रणात
- तुम्ही उभे राहून पाणी पिता का ? मग तुमच्यासाठीच आहेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
- ‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर ? हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित !
- तुम्हाला झोपेत बडबडण्याची सवय आहे का ? जाणून घ्या या सवयीमागील कारणे
- पेरुच्या पानांचे ‘हे’ उपाय करा, केसांच्या सर्व समस्यांपासून होईल तात्काळ सुटका
- ‘हे’ औषध घेण्यापूर्वी लक्षात ठेवा या १० महत्त्वाच्या गोष्टी, अशी घ्या काळजी
- जमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल
- फेसपॅक लावताना अजिबात करु नका ‘या’ ४ चुका, होईल दुप्पट फायदा
- ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे