जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी अनिल लुणिया, १११ वेळा रक्तदान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – संपत्ती, गाडी, बंगला मिळवण्यासाठी माणूस सतत तत्पर असतो. एखाद्या गरिबाला मदत करायची असेल तर आपली प्रतिष्टा कमी होईल. म्हणून आपण त्या व्यक्तीच्या साधं जवळही फिरकत नाही. परंतु या स्वार्थी वृत्तीला अपवाद असणारे औरंगाबादेतील अनिल लुणिया हे गेल्या २३ वर्षांपासून त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले आहे.


त्यांना गरिबांचा कैवारी म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण लुणिया यांचा ‘ए’ निगेटिव्ह हा अतिशय दुर्मिळ रक्तगट आहे. या गटाचे रक्त सहसा कुठे उपलब्ध होत नाही. त्यामुळे लुणिया हे रक्तदानासाठी सतत तत्पर असतात. आतापर्यंत १११ वेळा रक्तदान करणाऱ्या लुणिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.

दरम्यान लुणिया हे गेल्या ३४ वर्षांपासून रक्तदान करत आहेत. त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात स्वखर्चाने जाऊन ११ वेळा रक्तदान तर नाशिकला जाऊन १५ वेळा रक्तदान केलं आहे. रक्ताचा काय कुठे कारखाना नाही. ते फक्त माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकत. अपघात झाल्यांनतर त्या रुग्णाला तात्काळ रक्ताची गरज असते.

अशावेळी रक्त वेळेवर मिळाले नाही. तर तो रुग्ण दगावन्याची फार शक्यता असते. किंवा शस्रक्रिया, बाळंतपण यात जास्त रक्त गेल्याने रक्ताची आवश्यकता भासते. म्हणून लुणिया हे रक्तदान स्वतः तर रक्तदान करतातच पण ते रक्तदानाची शिबिरे आयोजित करून ते अनेकांकडून रक्तदान करून घेतात. रक्तदान केल्याने शरीराला काहीच हानी पोहच नाही. आणि ४८ तासात तर पुन्हा नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्तदान करायला पाहिजे. असं लुणिया सांगतात आणि लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करतात.

याबरोबरच अनिल लुणिया हे देहदान, अवयवदान याची शिबिरे आयोजित करतात. औरंगाबादच्या घाटी रुणालयातील ज्या रुग्णांना अवयवांची गरज आहे. त्यांना देतात. किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांना प्रयोगासाठी बॉडी देतात. त्यांनी आतापर्यंत ५२६ डोळेदान आणि ९९ देहदान करून घेतले आहेत. लुणिया यांचे गरजू लोक,विद्यार्थी यांच्यासाठीचे कार्य खूप महान आहे. ते गरीब, अनाथ मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करतात.

तसेच प्रत्येक रक्षाबंधनला घाटी रुग्णालयातील महिला रुग्णांकडून राख्या बांधून घेतात. आणि राख्या सोबत त्यांना साड्या, बेडशीट भेट देतात. यावेळी रुग्णालयातील मुस्लिम महिलाही त्यांना राखी बांधत असल्याचे लुणिया सांगतात. एवढेच नाही तर आतापर्यंत त्यांनी १६ नागरिकांचे स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत.

तसेच औरंगाबादमधील मदर तेरेसा आश्रमातील १२२ मुलांना ते औषधी पुरवतात. एवढेच नाही तर घाटी रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी ते प्रत्येक रविवारी अन्नदान करतात. या थोर व्यक्तीसारख्या समाजसेवकांची सध्या समाजात खूप गरज आहे. कारण आजही अनेक लोक असे आहेत कि त्यांना एकवेळचे जेवणही मिळणे मुश्किल आहे. या लोकांसाठी अनिल लुणिया यांच्या सारख्या महान व्यक्तीची गरज आहे.

सिने जगत – 

 

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !