3 गुन्हे दाखल झाल्यानंतर RTI कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटेविरूध्द खंडणीचा आणखी एक FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आपल्याकडे असल्याचे सांगत केस मिटवण्यासाठी 40 लाख रुपये जबरदस्तीने घेतले आहेत. 2012 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मारुती निवृत्ती नवले (वय ७१, रा रचना फार्म, एनडीए रोड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैनसुख गांधी यांचे मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची मिळकत व शाळेबाबत असलेल्या मतभेदाचा फायदा घेऊन चैनसुख गांधी यांना नवले यांच्या विरोधात बराटे यांनी गुन्हा दाखल करायला लावला. त्यानंतर सिंहगड एज्युकेशन संस्थेच्या एरंडवना येथील कार्यालयात येऊन नवले यांना बराटे यांनी तुम्ही आमचे परस्पर गांधी यांच्याशी बोलून वाद मिटवता काय? मी ही केस मिटवू देणार नाही.

माझ्याकडे पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आहे. केस मिटवायची असेल तर १ कोटी रुपये द्यावी लागेल. नाही तर  ठार जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला घाबरुन नवले यांनी त्यांना २० लाख रुपये रोख व २० लाख रुपयांची १०० ग्रॅम सोन्याची ६ बिस्किटे दिली. दरम्यान बराटे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे समजल्यावर नवले यांना धिर आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.