भारत आणि PM मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे PAK चा हात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे काही दिवसापूर्वी बांग्लादेश दौऱ्यावर होते. त्यानंतर बांग्लादेशमध्ये हिसंक आंदोलन झालं आहे. तर यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याच पुढं आले आहे. भारत आणि मोदी यांच्या विरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तान कट्टरतावादी लोकांना फंड देण्यासोबतच त्यांची शक्य ती मदत करत आहे. अशी माहिती वरिष्ठ पातळीवरून मिळाली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर बांग्लादेशात हिफाजत-ए-इस्लाम अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करत आहे. तर पाकिस्तानी उच्चायोग ढाका, हिफाजत-ए-इस्लामला फंड देत आहे, यामुळे भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आंदोलन केलं जाऊ शकेल. तसेच बांग्लादेशच्या संसदेनं म्हटले आहे की, आम्ही धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही असलेलो देश आहोत. आम्ही या कृत्याचा निषेध करतो, हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलं. तसेच पाकिस्तानचं कृत्य नींदनीय आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की बांग्लादेश जमात-ए-इस्लामीवर निर्बंध घातल्यानंतर आता हिफाजत-ए-इस्लाम या नावानं त्याचं संचालन केलं जात आहे. हा पक्ष देशात शरीया कायदा लागू करू इच्छित आहे. असे बांग्लादेशच्या संसदेने आपल्या नवीन ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बांग्लादेशला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या २ दिवसीय दौऱ्यावर गेले होते. या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचं सूत्राकडून सांगण्यात आलं आहे. जमात आणि बीएनपीची लोकं हे हिंसक आंदोलन करत आहेत आणि यामागे पाकिस्तानचा हात असल्याचंही समोर येत आह. यामध्ये कट्टरतावादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम आणि पाकिस्तान उच्चायोगामध्ये संबंध असल्याचं बांगलादेश संसदेने म्हटलं आहे.

जमात-ए-इस्लामी हा पाकिस्तान समर्थक पक्ष –
जमात-ए-इस्लामी हा पाकिस्तान समर्थक पक्ष आहे. हा पक्ष कायमच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होता. सध्या त्यांच्यावर निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र जमात विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्च पार्टीच्या प्रमुख सहकारी पक्षांपैकी एक आहे. हिफाजतचं वर्तमान नेतृत्व भारत विरोधी आहे आणि विशेष करून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधातील आहे. परंतु हिफाजतचा मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधातील कोणताही कार्यक्रम नव्हता. परंतु मोदी हे ढाक्यात आल्यानंतर काही लोकांनी बैतुल मुकर्रम मशिदीसमोर हिंसक आंदोलन सुरू केलं. हे वृत्त संपूर्ण देशभर पसरलं, त्यानंतर हिफाजतही यात सामील झालं, असे ज्येष्ठ पत्रकार मसूल करीम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हिसाचार हा ब्राह्मणबारियाच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात झाला. याव्यतिरिक्त ढाक्यातील एका मशिदीतही हिंसाचार झाला. या हिसाचारात हत्जारी, चटगांव आणि ब्राह्मणबारियाला फटका बसला होता. या हिंसाचारावर स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र बॅरिस्टर शेख फजल नूर तपोश यांनीदेखील माहिली दिली. बांगलादेशात इस्लामी कट्टरतावाद्यांद्वारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला दहशतवादी संघटना जमात-ए-इस्लामीचं समर्थन मिळालं आहे. याचा यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI शी संबंध होता, असे दौरा कव्हर करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.