अनुपम खेर यांचा मोठा खुलासा ; म्हणाले माझ्यासोबत पहिल्यांदाच झाले ‘असे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांवर छाप टाकणारा प्रसिद्ध असलेला अभिनेता अनुपम खैर सध्या बेरोजगार आहे. २५ मे ला अनुपम खैर यांना चित्रपटसृष्टीत येऊन ३५ वर्षे झाली. पण आत्तापर्यंत त्यांच्यावर अशी वेळ आली नाही. अनुपम खैर यांच्याकडे सध्या कोणताच चित्रपट नसला तरी ते स्वतःला दमदार अभिनेता समजतात.

अनुपम यांनी सांगितले की, ‘गेल्या ३५ वर्षात बेरोजगार होण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नाही. मी ३५ वर्षाच कोणत्यानकोणत्या तरी चित्रपटात काम केले आहे. पहिल्यांदा असे झाले की, माझ्याकडे आत्ता कोणताच चित्रपट नाही.’

ते पुढे म्हणाले की, ‘पहिल्यांदाच असे घडले की, माझ्याकडे एकही चित्रपट नाही. २५ मे ला मला चित्रपटसृष्टीत येऊन ३५ वर्षे झाली. २५ मे ला माझा पहिला चित्रपट ‘सारांश’ प्रदर्शित झाला होता. या ३५ वर्षात माझ्या जीवनात अनेक चढ-उतार आले. सध्या माझ्याकडे कोणताच चित्रपट नाही. जितके चित्रपट निर्माते आहेत त्यांनी माझ्याकडे या. मी सगळ्यांच्या चित्रपटात काम करेन.’

अनुपम खैरने आत्ताच ‘वन डे’ चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली आहे. या चित्रपटात अनुपम यांच्यासोबत ईशा गुप्ता, कुमुद मिश्रा, जाकिर हुसैन, जरीना वहाब, मुरली शर्मा, अनंत महादेवन आणि राजेश शर्मा आदी कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्देशन अशोक नंदा यांनी केले आहे.