…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आणि प्रोड्युसर अनुष्का शर्माची इच्छा आहे की, प्रेक्षकांना अशा स्टोरीज दाखवणं ज्या त्यंनी आधी कधीच पाहिल्या नसतील. प्रेक्षकांना काही नवीन मिळालं तर तिला आनंद मिळेल असं ती सांगते. प्रेक्षकांना नवीन काही देण्यासाठीच ती प्रोड्युसर बनली आहे असं तिचं म्हणणं आहे.

अनुष्का शर्मा म्हणते, “हे संयुक्तपणे दोघांसाठीही (भाई आणि पार्टनर प्रॉडक्शन हाऊस) कर्णेश (अनुष्काचा भाऊ) आणि माझ्यासाठी आहे. मला आनंद आहे की, लोक जुन्या कंटेटमधून बाहेर पडत आमच्या नवीन प्रयत्नांना पसंत करत आहेत.”

बुलबुल आणि पाताल लोकला लोकांची पसंती

अनुष्का म्हणते, “माझ्या करिअरमध्ये मी माझ्या आवडीच्या सिनेमा आणि भूमिकेतून कामयच वेगळा आवाज उठवला आहे.” अनुष्काची वेब सीरिज पाताल लोक आणि बुलबुल यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

नवीन कंटेट बनवत राहिल

अनुष्का म्हणते, “आम्ही ज्याप्रकारे प्रेक्षकांसमोर नवीन कहाणी घेऊन येत आहोत त्याबद्दल अभिमान आहे. आमच्याकडे कल्पनांची मौलिकता आहे आणि ती आम्ही कायम ठेवू इच्छित आहोत.” अनुष्काचा भाऊ कर्णेशचं म्हणणं आहे की, प्रेक्षक एवढं प्रेम देत आहे त्याबद्दल तो त्यांचा आभारी आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिची बुलबुल सीरिजही रिलीज झाली आहे. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.