‘ट्रायबल’मध्ये शिक्षकांना भरतीनंतरही दिले नाहीत नियुक्ती आदेश : आमदार राजू तोडसाम   

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन – आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाने पेसा कायद्या अंतर्गत जुलै- २०१८ रोजी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक आणि निरीक्षक अशा एकूण ५७ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली होती या मधील पात्र आदिवासी उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मात्र अद्याप दिले नाहीत. यावर आमदार राजू तोडसाम यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

या तक्रारीमध्ये मध्ये राजू तोडसाम यांनी पात्र असलेल्या आदिवासी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्याचबरोबर ‘ट्रायबल’चे तत्कालीन अप्पर आयुक्त सरोदे यांच्यावर देखील आक्षेप घेतला आहे.पेसा कायद्यांतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया राबवून आदिवासी समाजाला न्याय मिळावा,असा निर्णय याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला असूनही,नियमानुसार भरती प्रक्रिया राबवूनही ट्रायबल अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयाने ४५ माध्यमिक शिक्षक,८ उच्च माध्यमिक आणि चार निरीक्षक  पदांसाठी असणाऱ्या जागांसाठी आदिवासी समाजाचे उमेदवार पात्र असून नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. असे आमदार तोडसाम यांचे मत आहे.

आदिवासी समूहाच्या शिक्षक उमेदवारांची निवडकरण्यात आलेली  यादी त्याचबरोबर पात्रता यादी आणि संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात आली आहे.तरी देखील अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयाकडून पात्र शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबद विलंब का केला जात आहे ? याचा शोध घेतला पाहिजे असे आ. तोडसाम म्हणाले. आणि या गिरीश सरोदे यांची चौकशीची करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली आहे. हि भरती प्रक्रिया धारणी, अकोला, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी, किनवट व पुसद या सात प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्थ आश्रमशाळांसाठी राबविण्यात अली आहे.

भरती प्रक्रियेबाबत सर्व बाबी निस्तारल्यानांतर पात्र शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबद आदेश न देणे ही बाब ‘कोर्ट आॅफ कंटेम्प्ट’आहे. तीन दिवसांत नियुक्ती आदेश न दिल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा देखील आमदार राजू तोडसाम यांनी दिला आहे.

पेसा कायद्याअंतर्गत झालेल्या भरतीप्रक्रियेत निरीक्षकांसाठी असलेली पदे कायम ठेवली आहेत. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची परीक्षा घेऊनच ती पदे भरावीत,अशा सूचना प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिल्या आहेत. या प्रकरणी त्यानुसारच कार्यवाही देखील केली जाईल.

आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना अमरावती अपर आयुक्त कार्यालयाने आदिवासी समाजातील शिक्षकांसोबत खेळखंडोबा चालविल्याबाबत त्यांना अवगत केले जाईल. येत्या दोन दिवसांत याची दखल आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ घेतील, असे देखील आमदार.तोडसाम म्हणाले.