‘सिद्धूंना हटवले की नाही, मला माहिती नाही’ : अर्चना पूरन सिंह

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – कपिल शर्माच्‍या शोतून सिद्धू यांना हटवले की नाही, हे मला माहीत नाही असं वक्तव्य अर्चना पूरन सिंह यांनी केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर नवजोत सिंह सिद्धू यांनी या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘दशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढवा’ असं वक्तव्य सिद्धू यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्‍यांच्‍यावर सोशल मीडियावरू टीका होत आहे.

त्‍यामुळे नवजोत सिंह सिद्धू यांना कपिल शर्माच्‍या कॉमेंडी शोमधून हटवण्‍याची मागणी युजर्स करत होते. अशावेळी सिद्धू यांना चॅनेलने राजीनामा देण्‍यास सांगितल्‍याचे आणि शोतून बाहेर केल्‍याचे वृत्त समोर आले होते. त्‍याचबरोबर, सिद्धू यांच्‍या जागी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांची एन्‍ट्री होणार असल्‍याचे वृत्त होते. यानंतर याबाबत अर्चना सिंह यांना विचारण्यात आले त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्चना पूरन सिंह म्हणाल्या की, “कपिल शर्माच्‍या शोतून सिद्धू यांना हटवले की नाही, हे मला माहिती नाही. मी कपिल शर्मा शोचे ९ आणि १३ फेब्रुवारीला २ एपिसोड शूट केले आहेत. सिद्धू यांच्‍या जागी ती तात्‍पुरता रिप्‍लेसमेंट होती. कारण सिद्धू काही कामानिमित्त बिझी असल्‍याने मी हे एपिसोड शूट केले होते. या शोचे अद्‍याप प्रक्षेपण झालेले नाही.”