‘या’ कारणामुळे अर्जुन कपूर मलायकासोबत लग्न करायचे टाळतोय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्नाच्या विषयामुळे चर्चेत आहेत. एप्रिल मध्ये ते दोघे गोव्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी ही अफवा असल्याचे सिद्ध केले होते. परंतु आता सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, फॅमिली प्रेशरमुळे दोघांनी सध्या लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पप्पा आणि बहिणींचा विरोध

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका यांनी एप्रिलमध्ये प्लॅन केलेले लग्न पुढे ढकलले आहे. कारण अर्जुन कपूरचे वडिल बोनी कपूर आणि त्याच्या बहिणींना हे लग्न होऊ नये असे वाटते. त्यांनी आपल्या वतीने अर्जुनला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी अशीही माहिती समोर आली होती की, मलायका आणि अर्जुन दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी लग्न पुढे ढकलले आहे.

आता पुढे काय ?

अर्जुन-मलायकाच्या संपर्कात असणाऱ्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तमानातील स्थिती पाहून असे अजिबात वाटत नाही की अर्जुनचा आगामी सिनेमा रिलीज झाल्यानंतरही हे दोघे लग्न करतील. कारण या विसंगत लग्नाला थांबवण्यासाठी अर्जुन फॅमिलीकडून जास्त दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे पुढे नेमकं लग्न होईल किंवा नाही हे निश्चित सांगणे कठिण असणार आहे.