Army Jobs Alert : भारतीय सैन्य दलात ‘मेगा’भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : बिहारमधील बोधगयाचे बीएमपी ३ च्या ग्राउंडमध्ये पुढील वर्षी ४ ते १८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत भारतीय सैन्य दलासाठी भरती पुन्हा सुरू केले जाईल, ज्यात दक्षिण बिहारमधील ११ जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश असेल. या जिल्ह्यांमध्ये गया, औरंगाबाद, नवादा, अरवल, जमुई, जहानाबाद, कैमूर, रोहतास, नालंदा, लखीसराय आणि शेखपुरा यांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेबाबत, सैन्य भरती कार्यालय, गया यांचे संचालक कर्नल विक्रम सैनी म्हणाले की, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ६ डिसेंबरपासून सुरू झाली असून १९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

कसा करावा अर्ज :
संबंधित जिल्ह्यातील उमेदवार www.joinindianarmy.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. १९ जानेवारीपर्यंत अर्ज घेतल्यानंतर जिल्हावार यादी तयार केली जाईल आणि २५ जानेवारीपर्यंत सर्व उमेदवारांचे प्रवेश पत्र अपलोड केले जाईल. ४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तारीख आणि जिल्हावार शारीरिक तपासणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. इच्छुक उमेदवार नियोजित तारखेच्या एक दिवस आधी बोधगयाच्या बीएमपी ३ कॅम्पसच्या मैदानावर जातील, जेथे दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांची शारीरिक तपासणी परीक्षा घेता येईल. या तपासणीत यशस्वी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि जून २०२० पर्यंत अंतिम यशस्वी उमेदवार प्रशिक्षणासाठी पाठविला जाईल.

दलाल आणि ठगांपासून सावध रहा :
सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल विक्रम सैनी यांनी उमेदवारांना दलालांपासून सावध रहाण्याचे आवाहन केले आहे. सैनी म्हणाले की, उमेदवारांनी केणत्याही फसवणुकीला बळी पडण्याची गरज नाही. धावण्याच्या किंवा लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी उमेदवार कोणत्याही व्यक्तीची किंवा कोचिंगची मदत घेऊ शकतात, परंतु या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी पैसे खर्च करीत नाहीत. कर्नल सैनी यांनी सांगितले की, जर कोणताही दलाल हा दावा करत असेल तर आम्हाला त्वरित यासंदर्भात माहिती द्या.

दरम्यान, आता सैन्यात जवान पदासाठी खूप कठीण परीक्षा आहे. मागील वेळी या भरती मेळाव्यात ५० हजाराहून अधिक उमेदवारांनी भाग घेतला होता, त्यापैकी केवळ ४०० जणांची निवड झाली. तर बिहारच्या बोधगया येथे ४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान भरती मेळावा घेण्यात येणार आहे. शारीरिक स्वास्थ्यासह, अभ्यासादरम्यान केलेली कठोर परिश्रम आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.

कर्नल विक्रम सोनी यांनी सांगितले की, ही शर्यत जिल्हावार आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासीच सहभागी होऊ शकतात. तर भरती मेळाव्याला येताना निवासी प्रमाणपत्र आणि आपल्या ओळखीशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार ठेवा. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्यानंतर ही चूक नंतर पकडल्यास कठोर कारवाई केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/