ऐन पाडव्याच्या दिवशीच जवानाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

येवला : पोलीसनामा ऑनलाईन – सुट्टीनिमित्त गावी आलेल्या जवानाच्या दुचाकीला धडक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे. मुलगा आणि भावासह ते मनमाडकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. मुलगा आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ऐन पाडव्याच्या दिवशीच जवानाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सागर खुरसने असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

सागर खुरसने हे सैन्य दलात नोकरी करतात. ते पाडव्यानिमित्त आपल्या मुळ गावी ठाणगाव येथे आले होते. ते मुलगा आणि भावासोबत दुचाकीवरून जात मनमाडकडे जात असतान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान सुट्टीवर घरी आल्यानंतर खुरसने यांचा अपघाती मृत्यू झाल्यानें परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर त्यांच्या परिवारावर ऐन पाडव्याच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.