नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन
[amazon_link asins=’B077ZZ83ZS,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b13d9113-b9a3-11e8-8d32-23bcc045bee4′]
आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली होती. या दीर्घ बैठकीनंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जेटली यांनी सामान्यांना दिलासा देणारे कोणतेही तातडीचे उपाय जाहीर केले नाहीत. उलट सरकारची सर्व भिस्त भविष्यावर असल्याचेच सांगितले.
[amazon_link asins=’B07811Y98Q,B075F4QR9J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be3089e2-b9a3-11e8-a6ee-9b6023ecacd6′]
जेटली म्हणाले, करमहसूलात मोठी वाढ होत असल्याने आणि निर्गुतवणुकीच्या लक्ष्यात वाढ केली जाणार असल्याने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के इतकी वित्तीय तूट राखण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. चलनफुगवटा बहुतांश आटोक्यात असल्याने आर्थिक वृद्धीदर अपेक्षेपेक्षा जास्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१८-१९ या वित्तीय वर्षांसाठी ७.२ टक्के ते ७.५ टक्के इतका वृद्धीदर गृहित धरण्यात आला होता. प्रत्यक्षात त्यात आणखी वाढ होईल, असा दावा जेटली यांनी केला.