‘माझ्या बायोपिकमध्ये बॉलिवूडची हीच अभिनेत्री हवी’ : अरूणा इराणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी चित्रपटसृष्टीत तीनशे पेक्षा अधिक चित्रपटांतून काम करत ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना आपण सर्वच ओळखतो. आपल्या तब्बल सहा दशकांच्या कारकीर्दीत तीनशे पेक्षा अधिक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या अरुणा इराणी सध्या स्टार प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेत दादीची भूमिका साकारीत आहेत हेही सर्वांना माहीत आहे. आपण सर्वांनी त्यांना थेट ‘बॉम्बे टू गोवा’पासून ‘बेटा’ आणि ‘हसीना मान जाएगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना पाहिले आहे.

अरुणा इराणी यांना प्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्या जीवनावरील बायोपिक निर्माण करण्याची कोणी सूचना केली होती का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “मी बरेच बायोपिक आतापर्यंत पाहिले असून ते संबंधित व्यक्तीची फक्त चांगली आणि विधायक बाजूच दर्शवितात. पण संबंधित व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व बाजूंचे त्यात दर्शन घडले पाहिजे, मग ती चांगली असो की वाईट, असे माझे मत आहे. तसे झाले, तरच तुम्ही त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहता.”

इतकेच नाही तर पुढे त्या असंही म्हणाल्या की, “हो, अनेक निर्मात्यांनी माझ्यावर बायोपिक बनवण्याचा विचार बोलून दाखविला होता. तसा जर तो तयार करण्यातच आला, तर त्यात माझ्या जीवनातील सर्वच पैलूंचे दर्शन घडावे, असा माझा आग्रह राहील. माझ्या भूमिकेसाठी आलिया भट हीच योग्य राहील, असे मला वाटते.”

आलिया व रणबीरच्या नात्यात अंतर ?