Ashish Shelar | उद्धव ठाकरेंच्या मोदींच पर्व संपल्याच्या टीकेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर, म्हणाले-‘हे म्हणजे अति झाले आणि हसू आले..!’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पत्रक काढून टीका केली आहे. या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai BJP President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. सलग तीन ट्विट करुन आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हिंदुत्वाचा (Hindutva) ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न उद्धव ठाकरेंना पूर्ण करता आले नाही. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करु नये का? ते इतरांनी पूर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? असा सवाल शेलार यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) पर्व संपत असल्याची टीका केलीय ती म्हणजे अती झालं आणि हसू आलं, अस असल्याचा टोला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लागवला आहे.

 

आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, आपल्या वडिलांच्या विचारांना झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात. याचा, त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते ! फक्त भरला आहे म्हणायला मोठे मन लागते, असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

 

दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे उद्धव ठाकरे यांना वाटतेय. हे म्हणजे अति झाले आणि हसू आले..! पण काय करणार? आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की, बाहेरचे विशाल जग संपल्यासारखे वाटायला लागतेच ! असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केल्याचे त्यांनी म्हटले.

 

उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेत घणाघाती टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बाळसाहेबांच्या नावानं मत मागण ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे.
भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे.
या निमित्ताने भजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला.
महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईलच, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

 

 

Web Title :- Ashish Shelar | ashish shelar leader of bjp gave answer to uddhav thackeray criticism on devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

अकाउंट अ‍ॅग्रीगेटर सिस्टमशी जोडले SEBI, शेयर बाजारसंबंधी आर्थिक माहिती शेअर करणे होईल सोपे

 

NPS Tier 1 Vs Tier 2 | मिळवायची असेल जादा Tax सवलत, एनपीएस खाते उघडताना निवडा ‘हा’ पर्याय

 

Aditya Thackeray | ‘गद्दारांना काय मिळालं ‘बाबाजी का ठुल्लू’, आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला (व्हिडिओ)