मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

मराठा आरक्षणावर विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीकडे अनेक विचारवंतांनी पाठ फिरवल्याची टीका राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीकडे बहुतांश मान्यवरांनी पाठ फिरवली यावरून मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही हे स्पष्ट आहे. राज्यातील जनतेचा मुख्यमंत्र्यांनी विश्वास गमावला आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’081bcced-965b-11e8-85ff-53b3373a8376′]