वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेसाठी शेवटपर्यंत तयार : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत आघाडीत जाण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपले दरवाजे बंद असल्याचे म्हटले आहे. मात्र, वंचित आघाडीसोबत युतीच्या चर्चेचसाठी आपण शेवटपर्यंत तयार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

गांधीभवन येथील लोकसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीपूर्वी अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी नगरच्या जागेसंदर्भात आपले मत व्यक्त केले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजिनामा मागण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा मागणार का असे विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले, मला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांना अद्यापपर्यंत कोणीही राजीनामा मागितलेला नाही. नगरच्या जागेची आमची मागणी आहे. ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असे देखील चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात आपले मत मांडले. प्रकाश आंबेडकरांनी युतीच्या चर्चेसाठी दरवाजे बंद झाल्याचे म्हटले आहे. तरी देखील आम्ही शेवटपर्यंत युतीच्या चर्चेसाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी नागपूर मतदार संघातील नाना पटोले यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचाच विजय होईल.

ह्याहि बातम्या वाचा –

खोतकरांना उमेदवारी द्या ! अन्यथा शिवसेना भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेन

निवृत्त IAS आधिकऱ्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

शिवसेनेच्या अर्जून खोतकरांबद्दल कॉंग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू विरोधात हुंडा आणि लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

दानशूरता ! समाजसेवेसाठी अझीम प्रेमजी यांचं 1,45,000 कोटींचं दान, बिल गेट्सलाही टाकले मागे