हार्दिकचा एक्झिट नंतर टीम इंडियाला आणखी दोन झटके बसले आहेत. हार्दिक पाठोपाठच पालघरचा गोलंदाज शार्दूल ठाकूर व अष्टपैलू अक्षर पटेल दुखापती मुळे टीम मधून बाहेर पडले आहे. महत्वाचे म्हणजे या दुखापती व एक्झिटमुळे दीर्घ काळापासुन प्रतिक्षीत असणाऱ्या रविंद्र जडेजाचे पुनरागमन होत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db03f974-bcc5-11e8-ad3b-136e9a764cef’]
इंग्लंडमध्ये टी-20 सीरीजमधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याऱ्या दीपक चहरने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ऑल-राऊंडर हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडल्या नंतर, त्याची जागी ऑल-राऊंडर दीपक चहरची निवड करण्यात आली आहे. आगमी काळात दीपक हार्दिकची कमी भरुन काढेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दीपक चहर आजच दुबईसाठी रवाना होणार आहे. जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यावेळी बुमराहच्या जागी चहरला टीममध्ये घेण्यात आले होते.
Asia Cup 2018: हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर
अन् हार्दीक मैदानात कोसळला….
भारताने पाकिस्तान विरोधी आशिया चषकात सामना जिंकला खरा.. पण भारताचा ऑल राऊंडर खेळाडू चांगलाच जखमी झाला. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना हार्दिक चेंडू फेकत असताना दुखापतग्रस्त झाला. वेदना असहाय्य होऊन तो अचानक खाली कोसळला. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन त्याला लगेच मैदाना बाहेर काढण्यात आले. हार्दिक जागी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी या वेळी मनीष पांडेने घेतली. केदार जाधव चा गोलंदाजी वर मनीष पांडेने पाकिस्तानचा कर्णधाराची झेल घेत त्याला मैदानातून चालते केले.
[amazon_link asins=’B07BGD2CHR,B01MZZLLFC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’123f9321-bcc7-11e8-9579-afe55b3d1a00′]