थरारक !!! भारताची पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात मात

जकार्ताः

हँडबॉल क्रीडा प्रकारात भारत -पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना चांगलाच थरारक, उत्कंठावर्धक ठरला . अटीतटीच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अवघ्या शेवटच्या सेकंदात २८-२७ अशा फरकाने पराभव केला.

भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रचंड चुरस होती. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान ती क्षणाक्षणाला वाढत गेली. कधी भारताची आघाडी, तर कधी पाकिस्तानची, अशी अटीतटीची लढत संपूर्ण सामन्यात रंगली. आधी ५-२ अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानशी भारतानं ५-५ अशी बरोबरी केली. नंतर पुन्हा पाकिस्ताननं सरशी केली. त्यानंतर बरोबरी – आघाडीचा हा खेळ शेवटपर्यंत सुरू राहिला. शेवटच्या मिनिटांमध्ये भारतानं २७-२५ अशी आघाडी घेतली होती, पण पाकनं लागोपाठ दोन गोल करून ती भरून काढली. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली. भारतीय संघानं टाइमआउट घेतला आणि शेवटच्या सेकंदाला पुनियानं गोल करून विजय खेचून आणला.

[amazon_link asins=’B07D77V1DX,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26bcee44-a79d-11e8-9896-f5bb149a508b’]

मलेशियाविरुद्धच्या पहिला सामना भारतानं ४५-१९ असा जिंकला होता . सलग दुसरा सामना जिंकून भारताने पदकाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.