Assembly Election results 2022 | काँग्रेसच्या पराभवानंतर शरद पवारांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Assembly Election results 2022 | पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाचही राज्यांमध्ये निवडणुकांनंतर आता निकाल हाती आले आहेत. पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपला (BJP) सत्ता राखण्यास यश आले आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसच्या (Punjab Congress) अंतर्गत कलहाने मोठा पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या पराभवाबाबत (Assembly Election results 2022) महत्त्वाचे निरीक्षण (Observation) नोंदवत काँग्रेसला सल्ला दिला आहे.

 

शरद पवार म्हणाले, काँग्रेस पक्षाचा 1977 साली यापेक्षा वाईट पद्धतीने पराभव झाला होता. मात्र त्यानंतर 1980 मध्ये देशातील जनतेने पुन्हा काँग्रेसला सत्ता दिली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये झालेल्या पराभवाने (Assembly Election results 2022) लगेच नाउमेद होण्याचे कारण नाही. राजकीय पक्ष (Political Party) हे काही एका क्षणात संपत नाहीत. पण काँग्रेसच्या नेतृत्त्वाने आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांनी आपण कुठे कमी पडलो, कुठे एकत्र येण्याची गरज होती आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे होते, याचं आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे पवार यांनी म्हटले आहे.

 

तर जनता तुम्हाला स्विकारेल
काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करुन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली तर जनता तुम्हाला पुन्हा स्विकारेल, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शरद पवार मुंबईत (Mumbai) पत्रकारांसोबत बोलत होते.

म्हणून काँग्रेसचा पराभव
पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Internal Disputes) आणि केंद्र सरकारविषयी (Central Government) असलेल्या रागामुळे जनतेने आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला. तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची चूक झाली असे वाटत नाही. अखिलेश यादव यांना मिळालेल्या जागा दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.

 

जनमताचा आदर केला पाहिजे
विरोधी पक्ष (Opposition) म्हणून आपण जनमताचा आदर केला पाहिजे. ईव्हीएम (EVM) संदर्भात अनेकांच्या तक्रारी आहेत.
पण मला याविषयी काही बोलायचे नाही. तेलंगणा (Telangana), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), केरळ (Kerala),
तामिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्रात (Maharashtra)
अजूनही बिगरभाजप सरकार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी (Budget Session)
सर्व विरोधी पक्ष दिल्लीत एकत्र जमतील तेव्हा देशात एक प्रभावशाली पर्याय देण्यासाठी
आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामतंर्गत (Common Minimum Program) एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

Web Title :- Assembly Election results 2022 | ncp chief sharad pawar reaction on assembly election results 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikki Tamboli Superbold Look | निक्की तंबोलीनं रिवीलिंग टॉप घालून इंटरनेटची वाढवली गर्मी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

 

Pune Corporation | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील टीपी स्किमचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करायला (PMC) सर्वसाधारण सभेची मान्यता

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी