महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये दिवाळीपूर्वीच नवे सरकार स्थापन होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित गुरुवारी ही घोषणा केली जाऊ शकते असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात 288, हरियाणा 90 तर झारखंडमध्ये 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन नुकताच आढावा घेतला.
सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाने आज हरियाणा येथील मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली. दोन्ही राज्यांच्या गृह विभागांशी तसेच गृह मंत्रालयाशीही चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.
- रोज काही वेळ तर्जनीवर दाब दिल्यास होतील ‘हे’ खास फायदे
- गुलाबाच्या पाकळ्या देतात १० आरोग्य फायदे, अवश्य जाणून घ्या
- ‘एरियल योग’ माहित आहे का ? मसल्स, खांदे आणि स्पाइन होईल मजबूत
- ‘बॅलन्स डायट’ म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
- ‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत
- आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला
- हिरव्या पालेभाज्यांसह ‘लाल’ रंगाच्या भाज्यामध्येदेखील आहेत ‘ही’ पौष्टिक तत्व
- लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे
- ‘दीर्घायुषी’ होण्याचा मार्ग सापडला, जगा ‘असे’ आयुष्य
- सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी रोज ‘हे’ पौष्टिक पदार्थ खा