Farmer Protest News : शेतकरी आंदोलनामुळं ‘या’ 3 राज्यांना होतंय दररोज 3500 कोटींचं नुकसान
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोचॅम (Assocham) ने शेतकरी आंदोलना (Farmer Protest) वर लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना आवाहन केले आहे. या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर अवलंबून आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) उदयास येण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या निषेधामुळे रस्ते-महामार्ग आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर मोठा अर्थसंकल्प खर्च करण्याची सरकारची बांधिलकी खोळंबलेल्या अवस्थेत आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे अधिक गुंतवणूक होईल आणि वाढत्या रोजगाराचा व भरभराटीचा फायदा लोकांना होईल.
शेतकरी आंदोलनाबाबत भाजपाच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या पर्यटन-संस्कृती आणि अध्यात्म विभागाच्या मंत्री उषा ठाकूर आज आपल्या पक्ष आणि सरकारच्या बचावासाठी उतरल्या. ठाकूर यांनी इंदोरमध्ये सांगितले की, पंजाब आणि हरियाणामधील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलनाला चालवत आहेत. यामध्ये डावी विचारसरणी आणि ‘तुकडे-तुकडे गँग’ समाविष्ट झाली असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. या टोळीला यात कधीही यश मिळणार नाही. उषा ठाकूर म्हणाल्या की खोटा कट रचणे फार काळ चालणार नाही.
कृषी कायद्यातील गोंधळ दूर करण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे
मंत्री उषा ठाकूर म्हणाल्या की, कृषी कायद्यातील गोंधळ दूर करण्यासाठी भाजपा जनजागृती मोहीम राबवित आहे. कृषी विधेयकाबाबत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. भाजपाने आता शेतकऱ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे. त्या म्हणाल्या की, भाजपाचे मोठे नेते शेतकर्यांना कृषी कायद्याची माहिती आणि त्याचे फायदे सांगतील. शेतकऱ्यांना सांगितले जाईल की भाजपा सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ही गाव, गरीब आणि शेतकरी आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना अधिकाधिक संधी आणि पर्याय देणार आहेत.