दररोज फक्त 7 रुपयांची बचत करा अन् मिळवा दरमहा 5,000, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ फायदेशीर योजनेबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या भविष्याचा आपण विचार करत असतो. त्यासाठी बचत करणे, गुंतवणूक करणे किंवा विमा उतरवणे यांसारख्या योजना सुरु करतो. पण सरकारची अशी एक योजना आहे तिच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 7 रुपयांच्या बचतीवर 5,000 रुपयांची पेन्शन दर महिन्याला मिळू शकते.

अटल पेन्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. ही एक केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेचे संचालन PFRDA ही रेग्युलेटरी बॉडीकडून केले जाते. ही योजना विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. या योजनेतील सर्व सुविधा आणि फायदा भारत सरकारकडून दिला जातो. तसेच ही योजना इतकी फायद्याची आहे, की योजना सुरू असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंबाला योजनेचा फायदा सुरू राहतो. व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही मुलांना या पेंन्शनचा लाभ घेता येतो.

कोणाला मिळू शकतो याचा लाभ?

18 ते 40 वर्षादरम्यान सर्व नागरिक. या योजनेत किमान 20 वर्षापर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकखाते असणे गरजेचे आहे.

5,000 रुपये पेन्शन

जे असंघटीत कामगार आयकरच्या स्लॅबमध्ये येत नाहीत. तेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 1,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

किती गुंतवणूक गरजेची

या योजनेत गुंतवणूक वयानुसार करण्यासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. जितक्या लवकर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवाल तेवढ्या लवकर तुम्हाला कमी रक्कम दरमहा भरावी लागेल. 5,000 रुपयांच्या दरमहा पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा 210 रुपये योजनेसाठी जमा करावे लागतील. जर तुम्ही 39 वर्षाचे असाल तर तुम्हाला 1,318 रुपये दरमहा योजनेत जमा करावे लागणार आहेत.