पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउन केले आहे. त्यामुळे नागरिकांना व्यवहारासाठी एटीएम सेंटरमधून रक्कम काढावी लागत आहे. मात्र, कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे नागरिकांनी एटीएम सेंटरमध्ये कटाक्षाने काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाच्या व्हायरसची लागण होउ शकते.
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एसबीआयने ग्राहकांना रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यामांचा वापर करा असा सल्ला दिला आहे. डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून करोनाचा संसर्ग रोखण्याचा सल्ला दिला आहे. पैशांची देवा घेवाण करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करा, असा सल्ला एसबीआयने ग्राहकांना दिला आहे. लॉकडाउनच्या काळात आवशकता नसेल तर एटीएमला जाणे टाळा असा सल्लाही दिला आहे. अशात जर एटीएमला जाणार असाल किंवा गेला असाल तर एसबीआयने काही खास टिप्स दिल्या आहेत. त्या टिप्स वापरून करोनाचा संसर्ग रोखू शकतो.
एटीएममध्ये गेल्यास या सात गोष्टींची काळजी नक्की घ्या –
एटीएममध्ये आधीच एखादा व्यक्ती पैसे काढत असेल तर तो बाहेर येईपर्यंत तुम्ही आत प्रवेश करू नका. सुरक्षित अंतर ठेवा.
– सॅनेटाझरने हात साफ ठेवा.
– -एटीएमखोलीत इतर कशालाही स्पर्श करू नका.
– थंड,ताप, सर्दी आणि खोकला असेल तर एटीएममध्ये जाणे टाळा।
– -एटीएम खोलील खोकला आला तर रूमाल किंवा कोपर्यानं तोंड झाका करा.
– वापरेलला टिश्यू किंवा मास्क एटीएममध्ये सोडू किंवा टाकू नका.
– -एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड ऐवजी केडीट कार्डचा वापर करा.