Lockdown : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! 1.25 लाख मजुरांना पाठवणार त्यांच्या ‘गावी’, जाणून घ्या
मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू असल्यामुळे शेकडो परप्रांतीय कामगार अडकले असून शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने त्यांना दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात अडकलेल्या १.२५ लाख साखर कारखाना मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ही माहिती शुक्रवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.
ऊसतोडणी मजुरांना एक विशेष बाब म्हणुन काही अटींच्यावर आपल्या जिल्ह्यात परतीचा प्रवास करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेले अनेक दिवस हि मागणी होती. ऊस तोडणी मजुरांची राज्यभरातील संख्या एक लाख पंचवीस हजारपेक्षा आहे. pic.twitter.com/91pFWeGqzx
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 17, 2020
ट्विटर अकाऊंटवर हे पत्र सादर करत त्यांनी लिहिले की, ‘महाराष्ट्र सरकारने राज्यात विना वेतन राहणाऱ्या प्रवासी मजुरांना कोणत्याही अटीशिवाय त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्या संदर्भात निर्णय घेतला आहे. याची मागणी बर्याच दिवसांपासून होत होती. राज्यात साखर कारखान्यांमध्ये काम करणार्या मजुरांची एकूण संख्या १.२५ लाख आहे.’
माहितीनुसार, हे सगळे १.२५ लाख मजूर बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहणारे आहेत. ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात साखर कारखान्यात काम करत होते. हे सर्व मजूर ऊस हंगामात पश्चिम महाराष्ट्रात ६ महिने साखर कारखान्यात काम करण्यासाठी जातात.
महाराष्ट्र शासनाने मजुरांच्या कुटुंबासंबंधी अडचणी आणि त्यांच्या नाराजीमुळे कामगारांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना घरी पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि कोविड १९ ची तपासणी केली जाईल, असे म्हटले जात आहे. सर्व काही ठीक असेल तरच त्यांना घरी पाठवले जाईल. नुकत्याच मुंबईतील वांद्रे स्थानकात घरी पाठवण्याच्या अफवेमुळे शेकडो कामगार जमले होते. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमारही केला होता.