भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला केवळ २३५ धाव करता आल्या. भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. ट्रेव्हिस हेडच्या ७२ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला किमान २०० धावांचा टप्पा तरी गाठता आला, भारताने पाहल्या डावात १५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.या डावात सलामीवीर फिंच बाद झाल्यावर विराटने जे सेलिब्रेशन केले, ते ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना आवडले नाही.
या बाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले की अशा पद्धतीचे सेलिब्रेशन जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केले असते, तर संपूर्ण क्रिकेट जगताने त्यावर लगेच टीका केली असती. आनंद साजरा करत सेलिब्रेशन करणे आणि समोरच्या खेळाडूला हिणवणे यात अतिशय थोडे अंतर असते. विराटमध्ये क्रिकेटचे वेड आहे. पण त्याबरोबरच मैदानावरील सभ्यताही तितकीच महत्वाची असते, असे ते म्हणाले.
भारतीय खेळाडूंकडे कसोटी सामन्यांचा अधिक अनुभव होता. अनुभवाच्या जोरावर हे खेळाडू खेळत होते. सध्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ कमी अनुभवी आहे. त्यामुळे सध्याच्या संघाबाबत सयंम बाळगला पाहिजे. तसेच ते म्हणाले,की चेंडू कुरतडल्या प्रकरणानंतर सध्याच्या संघावर सर्वांची करडी नजर आहे. तर दुसरीकडे विराट विकेट पडल्यावर आक्रमक शैलीत सेलिब्रेशन करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या परिस्थीतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विराट सारखे सेलिब्रेशन केले असते तर सर्वात बाद संघ म्हणून त्याची हेटाळणी झाली असती.’
मैदानात कोहलीचा बॉलिवूड स्टाईल डान्स –