नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दररोज सुनावणी होत असताना जयपूरच्या राजघराण्यातील एका सदस्याने केलेल्या दाव्यामुळे सगळे हैराण झाले आहेत. ज्यावेळी कोर्टात, प्रभू श्रीरामांचे कुणी वंशज आहेत का असे विचारण्यात आल्यानंतर जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी ट्विट करत म्हटले कि, एकमात्र जयपूर घराणे प्रभू श्रीरामांचे ३०९ वे वंशज आहेत.
आमचे कुटुंब हे त्यांचा मुलगा कुश याचे वंशज आहेत, असंदेखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. याआधी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत देखील जयपूरच्या माजी राजकुमारी पद्मिनी देवी यांनी देखील आम्ही श्रीरामाचे वंशज असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, जयपूरचे माजी राजे आणि त्यांचे पती भवानी सिंह कुश हे श्रीरामांच्या ३०९ व्या पिढीचे आहेत. त्यांनी या प्रकरणी एक पुरावा देखील सादर केला असून यामध्ये श्रीरामांच्या वंशजांची नवे लिहिण्यात आली असून सवाई जंगसिंह हे २८९ वे वंशज तर महाराजा भवानी सिंह हे ३०७ वे वंशज दाखवण्यात आले आहेत. जयपूर राजघराण्याच्या माजी राजकुमारी पद्मिनी देवी यांनी राममंदिराच्या मुद्द्याबाबत बोलताना म्हटले कि, या मुद्यावर लवकरात लवकर निकाल लागायला हवा. कोर्टाने विचारल्यामुळे आम्ही समोर आलो आहोत, अन्यथा आम्हाला यामध्ये काहीही राजकारण करायचे नाही. हा मुद्दा सर्वांच्या आस्थेचा प्रश्न असल्यामुळे तात्काळ यावर निर्णय व्हावा.
Rajsamand MP&BJP leader, Diya Kumari claims that Jaipur's erstwhile royal family has descended from Lord Ram's son Kush, says, "I'm saying this on basis of manuscripts & documents we have. I said this after SC (during Ayodhya case) asked if there are any descendants of Lord Ram?" pic.twitter.com/U052PnDhtH
— ANI (@ANI) August 11, 2019
दरम्यान, प्रोफेसर आर नाथ यांनी या प्रकरणात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे या जागेवर राम मंदिर उभे असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या जागेचा आणि मशिदीचा काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राजघराण्याच्या जवळ वंशज असल्याविषयीची सर्व कागदपत्रे असून त्यांनी राजघराण्याच्या वतीने हि सर्व कागदपत्रे हायकोर्टाकडे आणि माजी मंत्री अरुण जेटली यांना पाठवली देखील होती.
- घशाचे इन्फेक्शन एका झटक्यात दूर करतील ‘हे’ उपाय, अवश्य करून पहा
- थंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा
- गोड खायला खुप आवडते का ? ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
- दुपारी झोपता का ? होऊ शकतात ‘हे’ ४ दुष्परिणाम, वेळीच ही सवय सोडून द्या
- फक्त लिंबू पाण्याने मिळत नाही पुर्ण फायदे, ‘हा’ पदार्थ फक्त चिमूटभर टाका
- ‘ब्रेस्ट इंप्लांट’ सर्जरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
- औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे
- तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय