अयोध्या वाद : 5 वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार, मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी फाडला ‘नकाशा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात प्रलंबित असलेली अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज दिवसअखेर पाच वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पूर्ण होणार आहे. सर्व पक्षकारांनी आपली बाजू लिखित स्वरुपात सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. यावेळी हिंदू माया सभेच्या पक्षकाराकडून सुनावणीसाठी आणखी काही वेळ मागितला होता. मात्र, या प्रकरणी सुनावणी आजच पूर्ण होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून ही सुनावणी प्रलंबित पडलेली होती. काल झालेल्या सुनावणी दरम्यान अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधण्याची बाबराने केलेली ‘ऐतिहासिक चूक’ होती. हिंदूंची पुरातन काळापासूनची श्रद्धा लक्षात घेऊन, त्या वादग्रस्त जागेवरील हिंदूंचा हक्क मान्य करून ती चूक सुधारण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन हिंदू पक्षकारातर्फे सर्वोच्च न्यायालयात केले गेले.
Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi while dismissing intervention application of one of the parties Hindu Maha Sabha in #Ayodhya land case: This matter is going to be over by 5 pm today. Enough is enough. https://t.co/wOxgLGEoWB
— ANI (@ANI) October 16, 2019
धवन यांनी नकाशा फाडला
हिंदू महासभेच्या वकिलांनी ऑक्सफर्ड पुस्तकातील नकाशाचा हवाला दिला यावेळी मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी या पुस्तकाचा नकाशा फाडला यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
CJI Ranjan Gogoi after submissions made by lawyer for All India Hindu Mahasabha in Ayodhya Ram Temple-Babri Masjid land case: If these are the kind of arguments going on, then, we can just get up and walk out. pic.twitter.com/UNtxTwm6l2
— ANI (@ANI) October 16, 2019
या आधी देखील न्यायालयात दोन्ही पक्षाच्या वतीने अनेक बाबींवर तपासणी आणि उलट तपासणी करण्यात आलेली आहे. न्यायालयाने हिंदू आणि मुसलमान अशा दोनीही गटांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. आज सुनावणीचा 40 वा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी