एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी बाबा रामदेवना विचारलं की, पतंजलिची नोंदणी जास्त भांडवल उभारण्यासाठी शेअर बाजारात करणार का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान यावर उत्तर देताना बाबा म्हणाले होते की, “एका महिन्यात या संदर्भात तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे.
“उत्पादनासाठी भारत हे उत्तम क्षेत्र बनू शकतं असं सांगताना बाबा रामदेव म्हणाले की, ” जर वाजवी दरांमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी चांगल्या जागा उपलब्ध झाल्या तर भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकेल. परंतु अनेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या समस्या बघता बँकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.” याशिवाय ‘मल्यासारख्या घटना घडू नयेत यासाठी बँकांनी काळजी घ्यावी व चांगल्या उद्योजकांनाच कर्ज द्यावं’ अशी पुष्टीही रामदेव यांनी जोडल्याचं दिसून आलं. पतंजलि ही धर्मादाय संस्था असे सांगत पतंजलिसाठी विदेशी भांडवल वा स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी हे दोन्ही पर्याय स्वीकारणार नसल्याचे दोन महिन्यांपूर्वी बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले होते.