राज्यपाल – भाजपचा डाव आम्ही हाणून पाडू : बच्चू कडू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आघाडीत बिघाडी करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र भाजप आणि राज्यपालांची खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचाही त्यांनी निषेध केला.

भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आघाडी सरकारमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीची कारस्थाने रचत आहेत. मुख्यमंत्र्याच्या हिंदुत्वावर राज्यपाल कोश्यारी यांनी बोट ठेवलं होतं. त्यावर कडू म्हणाले, पत्रातील भाषा पाहता ती असंवैधानिक होती. तसंच राज्यपालांच्या त्या वक्तव्याची तपासणी होणे गरजेचे आहे.

दुसरीकडे राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीवरून त्यांनी भाजपला चांगलच सुनावल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना असताना विरोधी पक्ष लोकांचा जीव धोक्यात घालणारी मागणी का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही वेळ मंदिर- मज्जिद उघडण्याची नसून हॉस्पिटल शाळा-कॉलेज कसे उघडता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची असल्याचे म्हणाले.