आपल्या मुलाला ठार मारुन वडीलांनी गाठले पोलिस स्टेशन, म्हणाले – ‘फेकून दिले नदीत, संपविला वंश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बालाघाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेथे एका वडिलांनी आपल्या 8 वर्षाच्या निरागस मुलाचे हात बांधून त्याला वैनगंगा नदीत बुडवून ठार मारले. घटनेनंतर आरोपीने स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की, मी माझ्या मुलाचा जीव घेतला आहे व त्याला नदीत फेकून दिले आहे आणि माझा वंश संपविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या निरागस मुलाची हत्या करण्यापूर्वी वडिलांनी त्याला बाजारात नेले. हा आरोपीच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. केक घेण्याच्या बहाण्याने वडिलांनी मुलाला आपल्याबरोबर नेले, तिथे त्याने प्रथम आपल्या मुलाचे हात बेल्टने बांधले आणि त्याला वैनगंगा नदीत बुडवून ठार मारले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

मुलगी केकची वाट पाहत होती पण मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण घरात शोककळा पसरली. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बालाघाटचे टीआय (टाउन इन्स्पेक्टर) विजय पस्तेहा यांचे म्हणणे आहे की, सुनील जयस्वाल नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाला नदीत बुडवून ठार मारले. आरोपीने सांगितले की, आपल्याकडे कोणतेही काम नाही म्हणून त्याने आपला वंश संपविला. आरोपी वडिलांच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. निशाच्या वाढदिवसासाठी केक आणून तो आपल्या मुलासह बाजारात गेला पण त्याने नदीत फेकून मुलाची हत्या केली. आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू आहे.

वडिलांनी आपल्याकडे कोणतेही काम नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो कुटूंबाचे पालनपोषण करू शकत नव्हता आणि त्याला कोणतेही काम नव्हते. ज्यामुळे त्याने आपल्या मुलाची हत्या केली. मुलाची हत्या करुन आपला वंश संपवायचा आहे असे तो म्हणाला. त्याचबरोबर कुटुंबीयांचे म्हणणे आहे की काम नसल्यामुळे आरोपी नेहमीत मानसिक तणावात होता.