Balayogi Mahesh Saraswati Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्नजन्मासाठी शिवनेरी ते तुळजापूर 450 किलोमीटरचा टप्पा पार करत घातले दंडवत
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Balayogi Mahesh Saraswati Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुनर्जन्म व्हावा यासाठी शिवनेरी किल्ला ते तुळजापूर (Shivneri Fort To Tuljapur) असा पायी शिवदंडवत घालण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) मंगळवेढा येथील बालयोगी महेश सरस्वती महाराज (Balayogi Mahesh Saraswati Maharaj) यांनी सुरु केला. या उपक्रमाचे स्वागत सोलापुरातील मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले आहे.
बालयोगी महेश सरस्वती महाराजांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाची सुरुवात किल्ले शिवनेरीहून केली. जवळपास 450 किलोमीटरचा टप्पा पार करत त्यांनी दंडवत घातलं आहे. तर, किल्ले शिवनेरी (Forts Shivneri), आळंदी (Alandi), पंढरपूर (Pandharpur) आणि आता तुळजापूर (Tuljapur) अशा 4 तीर्थक्षेत्रांना दंडवत घालत ते प्रवास करत आहेत. दरम्यान, 13 मे रोजी या संपूर्ण प्रवासाच्या समाप्तीचा कार्यक्रम तुळजापूर येथे ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Web Title : For the rebirth of Chhatrapati Shivaji Maharaj, Balayogi Mahesh Saraswati Maharaj crossed the 450 km stage from Shivneri to Tuljapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना