नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टेलीविजन वरील प्रसिद्ध मालिका बालिका वधू संपल्यानंतरही खूप चर्चेत होती. घराघरात ही मालिका पोचली होती. एक वेळ अशी होती की टेलीविजन वर रात्री आठ वाजता प्रत्येकाच्या घरी फक्त ‘बालिका वधू’ ही मालिका लावली हजार होती.
मालिकेतील संपूर्ण कास्ट खूप प्रभावी अशी निवडली गेली होती. या मालिकेने मनोरंजनातून भारतात प्रचलित असणाऱ्या बालविवाहासारख्या रूढीवादी प्रथेवर हल्ला केला. या मालिकेत तीन पिढ्या आहेत. पहिल्या पिढीमध्ये बालविवाहासारख्या जोडप्यामुळे दोन निष्पाप मुलांचे लग्न झाले आहे. आनंदी आणि जगीया अशी ती दोन मुलं. शोमध्ये आनंदीची भूमिका अविका गौरने केली होती.
अविका गौरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती म्हणून तिने लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात काम करण्यास सुरवात केली. कलर्सच्या बालिका वधू मालिकेनंतर अविका गौरने २०१७ पर्यंत प्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’ मध्ये रोलीची भूमिका साकारली होती.
अविका गौर 2017 पासून कोणत्याही मोठ्या मंचावर दिसला नाही. तसेच तीने कोणतीही मोठी मालिका केली नाही. मासूम दिसणारी आनंदी तिच्या वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस खूप सुंदर दिसत आहे. अविका गौर आपले छायाचित्रे सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते.
अविका गौरला २०१३ ला उय्यला जम्पला नावाच्या एका तेलगू चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी संधी देखील मिळाली होती. यानंतर देखील अविका गौर मुख्य भूमिकेत अजून काही चित्रपटांत दिसू लागली. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दुसरा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कारही तिला मिळाला आहे.
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा